Friday, September 25, 2020

शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांचा विकास नाही - आचणे

राणीसावरगाव/प्रतिनिधी 


विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजेत. शिक्षणाशिवाय  आर्थिक-सामाजिक यांचा विकास होत नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून उच्च शिक्षण घेतले पाहिजेत, असे प्रतिपादन आदर्श शिक्षक तुळशीराम सासणे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पदवी  प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  त्याप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. उत्तम देवकते हे अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर परीक्षा प्रमुख डॉ. बालाजी शिंदे, डॉ. विठ्ठल डुमनर,  डॉ.संतोष हंकारे, डॉ.नरसिंग बग, प्रा. अभय पाटील  यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.संगीत विभागांकडून विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. 


यावेळी आचणे म्हणाले," विद्यार्थी विकसित झाला पाहिजेत.  विकसित होण्यासाठी पदवी व पदवीत्तर होणे हि काळाची गरज आहे. शिक्षणामुळे रोजगार, राहणीमान, बोलण्याची पद्धत बदलते.  काही वर्षांपूर्वी तलवारीच्या जीवावर जग जिंकता येत होते मात्र ते चित्र बदलून सध्या अभ्यासाने जग जिंकता येते. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अभ्यासाकडे वळले पाहिजेत,असेही त्यांनी सांगितले.  डॉ. शिंदे म्हणाले," होळकर महाविद्यालयाचा निकाल दरवर्षी  चांगला लागतो. येथील विद्यार्थी हरियाना, मुंबई, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी शिकत आहेत.यामध्ये पोलीस निरीक्षक,प्राध्यापक, पोलीस, क्लारक आदीचा समावेश आहे. पदवी घेणे हे आयुष्यातील एक मोठा क्षण आहे. सर्वच विद्यार्थ्यांना विद्यापीठामध्ये जाऊन पदवी घेणे अशक्य आहे.त्यामुळे महाविद्यालयीनस्तरावर पदवी समारंभ कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना पदवीचे वाटप करावे,असे विद्यापीठाने ठरविले.त्यामुऴे आपल्या विद्यार्थ्यांना पदव्या घेणे हे सहज शक्य होत आहे. 



या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. उत्तम देवकते म्हणाले," कोरोणाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाच्या नियमानुसार पदवी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम आमच्या व विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील असाच हा कार्यक्रम झालेला आहे,असेही त्यांनी सांगितले. यावेळी मंगेश भुजंग भालेराव, सोनी रोहिदास पवार,वैभव गणपत आदोडे, अनिल केरबा रायबोले,कृष्णा रामेश्वर सोनसळे, अंकुश दत्ताराव भोसले, समाधान संदीपान नाटकर, हनुमानसिंग गणेशसिंग ठाकूर यांना  मान्यवरांच्या हस्ते पदवी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पाली विभागाचे डॉ. बालाजी गव्हाळे तर  डॉ. संतोष हंकारे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि वरिष्ठ, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्म-यांरी हजर होते.

No comments:

Post a Comment

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात ९८ जणांची सुरक्षा रक्षक पदासाठी निवड

राणीसावरगाव (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी विकास समिती आणि एस. एस. सिक्यु...