राणीसावरगाव (मंगेश भालेराव, सुशील तांबरे):
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अद्यासन केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.उत्तम देवकते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. आनंद घन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अद्यासन केंद्राचे समन्वयक डॉ.संतोष हंकारे हे उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.आनंद घन, यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भाषा वार प्रांत रचना या विषयावर आपले विचार व्यक्त केले.त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा आणि अखंडतेचा विचार करताना राज्य घटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेत अनेक महत्वाच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचना घटना परिषदेने मान्य केल्या. तसेच भारतात अनेक संस्थानिकांची राज्य होती. ती स्वताला सर्वोभोम समजत होती. त्यामुळे ती सतत त्यांच्या अस्तित्वाची मागणी करत होती. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्व जठील प्रश्न सोडविण्याच्या द्र्ष्टीकोनातून भारतीय राज्यघटनेद्वारे संघराज्य स्थापन केले. भारत हे एक अखंड राष्ट्र एकसंघ म्हणून उभे केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषा वार प्रांत रचणे बाबत व एकात्मता आणि सुरक्षितता महत्वाची मानली असे प्रा.आनंद घन यांनी सांगितले. या प्रसंगी प्रा.डॉ.बालाजी गव्हाळे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्रासाठी डॉ.संतोष हंकारे यांना त्रेचाळीश ग्रंथदान केले. तसेच प्रा.सारिका केदार,प्रा.शंकर घाडगे यांनी ग्रंथदान केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी पाली विभागाच्या वतीने बुद्ध पूजा पाठ घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.शंकर घाडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.बालाजी गव्हाळे, यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुशिल तांबरे, ऐश्वर्या पवार, गंगाधर गव्हाणे,मंगेश भालेराव यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्तीत होते.


